Gazal--मंदशा वार्याप्रमाणे..राजन शेगुंशी--Youtube link
Poetry and articles by Nishikant Deshpande
Sunday, July 24, 2022
वारकर्यांची मांदियाळी--(वीक एंड लिखाण)
आपला देश आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे भक्तिभावाचे माहेर घर आहे. जत्रा, यात्रा, सणवार आपल्या राज्यात खूपखूप आहेत. खरे सांगायचे तर या सर्व बाबी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. माणसांची आणि समाजाची जडणघडण त्यामुळे हवी तशी होते. याला दुसरे महत्वाचे कारण म्हणजे या भूमीत झालेले संत महात्मा हे पण आहेत.
आमच्या आभ्यासक्रमात परिपूर्ती नावाचा कथा संग्रह होता. सर्व कथा इरावती कर्वे या प्रसिध्द लेखिकेने लिहिलेल्या होत्या. या कथासंग्रहाचे नाव परिपूर्ती ठेवण्याचे एक गमतीदार कारण आहे. एकदा इरावती कर्वे काम आटोपून कॉलेजमधून (जेथे त्या नोकरी करत होत्या) घरी परतत असतांना घरापासून थोड्या अंतरावर त्यांचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता, आई येत असलेली पाहून त्याने आपल्या मित्रांना सांगितले "ती माझी आई आहे". हे त्यांनी स्वतः ऐकले. त्यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे की त्यांना वेगवेगळे पुरस्कार, मानसन्मान मिळाले. पण मुलाचे ही माझी आई आहे सांगितलेले ऐकून त्यांना जीवन सार्थकी लागल्याचा विचार मनात आला आणि म्हणून त्यांनी या कथा संग्रहाचे नाव परिपूर्ती असे ठेवले. किती उद्बोधक प्रसंग आहे नाही! हे मी सहजच सांगितले. पण आजचा संबंध असा की या पुस्तकात एक प्रदीर्घ लेख होता तो पंढरपूरच्या वारीवर! या वारीचे इतके सुंदर वर्णन आहे की वाचताना माणूस हरवून जातो. मी त्यावेळेस एका पेपरमधे आलेल्या परिक्षणात वाचले होते की हा लेख म्हणजे महराष्ट्राच्या संस्कृतीचा आरसा आहे.
आजही वारी म्हणजे वर्षातून दोन वेळेस येणारा सांस्कृतिक महोत्सव असतो. सर्व लोक उत्सुकतेने वाट बघत असतात. आपण ऐकतो की लोकांचा नास्तिकवादाकडे कल आहे हल्ली. पण पंढरीची वारी ही अपवाद दिसते. सालाबाद भाविकांची संख्या वाढतच आहे. परवाच कळाले की या महासागरात सॉफ्टवेअर कर्मचार्यांची पण एक दिंडी निघते.
हे सर्व व्यवस्थापन अगदी सुरळीत चालते. एवढा भक्तांचा महासागर असून वारी व्यवस्थित पार पडते हे विशेष!
सर्व वारकरी घरून कांहीही न घेता निघतात. या पायी प्रवासात त्यांची थांबण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था पण लोकच करतात. या वारीत सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश असतो. अगदी गाडीतून प्रवास करणार्यांपासून ते चालत चालत वाटचाल करणार्या पर्यंत!
ही वारी म्हणजे आपल्या संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. माझे एक मित्र वारीला जाऊन आले. ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी या वारीचे वर्णन " वारकर्यांची मांदियाळी" असे केले. हे सर्व ऐकून आठवून मी इतका प्रभावित झालो की मी लागलीच या विषयावर कविता, अभंग्,भारुड रचले. त्यातील एक रचना अभंग रुपात खाली माझ्या वाचकांसाठी पेश करतोय.
पांडुरंगा--
सदैव मनात । दिससी स्वप्नात ।
रंगलो तुझ्यात । पांडुरंगा ॥१॥
नको घरदार । नको येरझार ।
दावा मुक्तिद्वार । पांडुरंगा ॥२॥
मोहविते माया । सोकावली काया ।
जन्म गेला वाया । पांडुरंगा ॥३॥
रमलो नात्यात । आलो मी गोत्यात ।
पाय चिखलात । पांडुरंगा ॥४॥
असू दे उपाशी । रोज एकादशी ।
जागा दे पायाशी । पांडुरंगा ॥५॥
मठ्ठ निर्विकार । तरी मी अधीर ।
जागवी लागीरं । पांडुरंगा ॥६॥
जन्म गेला फुका ।पामराचे ऐका ।
माझा व्हावे सखा । पांडुरंगा ॥७॥
गळा तुझी माळ । तोडली का नाळ ।
तुझाच मी बाळ । पांडुरंगा ॥८॥
करमेना घरी । भाऊबंद तरी ।
रमतो मंदिरी । पांडुरंगा ॥९॥
"निशिकांत" म्हणे । कृपेचे चांदणे ।
होवो माझे लेणे । पांडुरंगा ॥१०॥
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३.
Monday, July 11, 2022
केविन कार्टर--(वीक एंड लिखाण)
आज जरा वेगळा विषय या स्तंभाखाली हताळावा असे मनात आले. दर वेळेस माझ्या कविता आणि गझलेच्या अनुषंगाने मी कांही लिहित असतो. अनेक रचनांच्या मागे कवीची कांही तात्कालीन भूमिका असते ज्याचा मी या लिखाणातून परामर्श घेतो. हे लेखन जवळ जवळ दोन वर्षापासून चालू आहे. का माहीत नाही पण आज थोड्या वेगळ्या वाटेने जावयाची उर्मी आली आणि विषय निवडीसाठी विचारचक्र सुरू झाले.
सांगा कुठे हरवले? (वीक एंड लिखाण) --02.07.22
या प्रगती करत असलेल्या जगात, संस्कृतीचा चेहरा मोहरा पण बदलत आहे. कालचे आदर्श आज कालबाह्य होत आहेत. हे संक्रमण बघून वयस्क लोक नाराजीचा सूर लावत आहेत तर नवपिढी आनंद व्यक्त करीत आहेत. खुषीचे मापदंड पण वेगवेगळे होत आहेत. आजच्यांना कालचे जुनाट, बुरसटलेले वाटतात तर कालच्यांना आजचे संस्कृती वार्यावर झोकणारे वाटतात, हे दोन संस्कॄतीतले द्वंद्व अनादीकालापासून चालले आहे पण हल्ली ते जरा जास्तच टोकाला पोहंचल्यागत वाटते हे नक्की.
झाली संध्याकाळ--(वीक एंड लिखाण)--15.06.22
मी जेंव्हा सॉक्रेटिस म्हणजे सुक्रातची कहाणी वाचली तेंव्हा थोडा अस्वस्थच झालो. तो एकटा अगदी लहानपणापासून एका निर्मनुष्य बेटावर रहात होता. पूर्ण आयुष्य त्याने तेथेच व्यतीत केले. हे जरी वाचायला सोपे असले तरी कल्पना करा की किती अवघड असते असे रहाणे. आपण कधी इतरांना न बोलता जगू शकतो का? मी असेही वाचले अहे की सुक्रातला कुणीही बोलायला नसल्याने तो स्वतःही बोलू शकत नव्हता. आपली लहान मुले आपले बोलणे ऐकून स्वतः जीभ हलवून बोलायचा प्रयत्न करतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तात्पर्य, सहजीवन हे माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना पण अवश्यक असते. एक म्हण आहे ना "Man is a social animal". सर्व प्राणीमात्रांना थोड्या फार फरकाने हे लागू पडतेच. म्हणून तर मानवाने कुटुंब पध्दती निर्मिली असावी.
मनातील सल--(वीक एंड लिखाण-- फादर्स डे)--18.06.22
सेमिसरी गझल--(वीक एंड लिखाण)--11.06.22
आपल्या समाजात संकेत असा आहे की सर्वांनी चालीरिती पाळून जगावे. नसता लोक लगेच चष्म्याच्या काचा पुसून चौकस नजरेने बघायला सुरू करतात. म्हणूनच सर्वांना लोक काय म्हणतील ही काळजी सदैव छळत असते. घरात पती पत्नीने भांडले तर चालते पण ती भांडणे कुणाला ऐकू जाणार नाही याची अमाप काळजी घेतली जाते. हेच लागू प्रत्येक क्षेत्रात पडते जरा लक्ष देऊन पाहिले तर.