( या कवितेस विनोदी म्हणा किंवा जीवनाचे जहाल वास्तव म्हणा. )
ऑक्सिजनचा वातावरणी
कमी पुरवठा असेल झाला
दाखल आयसीयूत व्हायचा
योग म्हणोनी जुळून आला
जीवन शैली तीच असूनी
वेळ पुढे का सरकत नाही?
रात्र आजही काल सारखी
तरी संपता संपत नाही
पत्नीसंगे गप्पा टप्पा
मित्र मैत्रिणी सोडुन झाल्या
भोळीला त्या कळले नाही
आज कशा या तारा जुळल्या?
मुबलक होता वेळ म्हणोनी
एक घेतले पुस्तक हाती
कसले वाचन! कानी माझ्या
माझी मैत्रिण बोलत होती
वहावलेल्या मनास माझ्या
नकोच होती निरव शांतता
चुळबुळ इतकी मनात माझ्या !
शांततेतही दिसे आर्तता
काल जाहले बंद फेसबुक
व्हट्सअॅपही तया सोबती
असे पुन्हा ना कधीच होवो
अशी विठ्ठला तुला विनंती
काल रात्री फेसबुक आणि व्हाट्सअॅप दोन्हीही जगभरात बंद पडले औटेजमुळे. त्यावरून सुचलेली कविता.
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment