Thursday, March 28, 2013

बिनकामाचे जुने पुराने


काळाच्या ओघात जाहले
अस्त हजारो राहघराणे
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

कोठीवरती वर्दळ आहे
आज, परंतू कोणासाठी?
नव्या पिढीतिल तारुण्याला
मजनू येती लुटण्यासाठी
हमिदाबाई वृध्द भळभळे
आठव्णींच्या चित्काराने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

नवीन रेषा, परीघ नवखा
नवी भूमिती जीवन झाले
जुनीच पत्नी नवी प्रेयसी
असे खूपदा त्रिकोण झाले
हीच कहाणी व्यापत आहे
इतिहासाचे कैक रकाने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

आज मितीच्या धुंद नव्यांनो
मनी एवढी जाण असू द्या
सुपातल्यांनो जात्यामध्ये
उद्या जायचे ध्यान असू द्या
दु:ख उद्याचे नकात विसरू
मस्त आजच्या सत्काराने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

सतार वाजे दिडदा दिडदा
कुणी छेडले जुन्या सुरांना ?
झंकाराने जुन्या सुरांच्या
नाद लाभला नव्या स्वरांना
जरी वाटतो नवीन लहजा
जुनेच गाती सर्व तराने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

जुने नवे हे दोन किनारे
भेद कशाला? एकच सरिता
जुना जुना तो प्राण सोडला
जन्म नव्याने घेण्याकरिता
बंद जाहला तरी गुदमरे
श्वास चितेवर किती धुराने?
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने


निशिकां देशपांडे मो.क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Sunday, March 24, 2013

(भाग-३) मराठी भाषादिनाच्या निमित्ताने


मराठी भाषादिनाच्या निमित्ताने समूहावर मला जे प्रश्न विचारले होते त्यांना प्रतिसाद मी दोन भागात दिला होता. कांही अपरिहार्य कारणाने कांही प्रश्नांना प्रतिसाद देवू शकलो नाही त्या बद्द्ल दिलगिरी व्यक्त करतो.
आज मी महेन्द्रने चारोळ्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाबद्दल थोडी चर्चा करतो. खरे तर महेंद्र स्वतःच उत्कृष्ट चारोळ्या लिहितो हे मला माहीत आहे. मी त्यच्या चारोळ्या लक्ष देवून वाचत असतो.
मी स्वतः चारोळ्या लिहीत नाही. पण चारोळ्या वाचतो. त्यातून माझ्या निदर्शनास जे आले ते येथ सांगत आहे.
कवितेप्रमाणे चारोळ्याचे कांही नियम असल्याचे मला माहीत नाही; आणि माझ्या वाचण्यातही आले नाहीत. पण ही रचना नाव सुचवते त्या प्रमाणे चार ओळींचीच असते. या मर्यादेमुळे थोडक्यात प्रभावीपणे सांगण्याची कसरत करावी लागते. यात कविच्या प्रतिभेचा कस लागतो. जरी आजकाल चारोळ्या उदंड झाल्याचे बोलले जात असले तरी; सुरेख चारोळ्या लिहिणे तसे अवघडच असते.
मी ज्या चारोळ्या वाचल्या आहेत त्यावरून मी चारोळ्या खालील प्रकारात विभागतो.
१)  अशा चारोळ्या ज्यांच्या चारही ओळीत यमक असते
२)  अशा चारोळ्या ज्यांच्या दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते.
३)  अशा चारोळ्या ज्याच्या पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते
४)  आशा चारोळ्या ज्यात यमक नसतेच.
या व्यतिरिक्त खालील प्रकार पण आहेत.
अ)  कांही चारोळ्या गजलेच्या वृत्तात असतात. त्यांच्या पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते. अशा चारोळ्यांना "मुक्तक" असे म्हणतात.उदाहरणा दाखल मी रचलेली दोन मुक्तके देत आहे.
१)  देत जा जखमा मला तू वेदनांचेही झरे
    भळभळू दे अन् पडू दे लाख हृदयाला चरे
    झेलता तव घाव ताजे विसरतो मी त्या जुन्या
    वेदनांना, अन् मनाला वाटते थोडे बरे>>>>>>>( देवप्रिया वृत्त )

२)  जी मनी बसली कधीची ती घरी आलीच नाही
    जी घरी आली रहाया ती मनी बसलीच नाही
    लावला मी मुखवटा अन् जिंदगी तडजोड बनली
    झाकली भळभळ अशी की ती कुणा दिसलीच नाही>>>>>>( व्योमगंगा वृत्त )

ब)  गजलेच्य वृत्तातील ( वरील प्रमाणे ) चारोळी जर उर्दूत लिहिली तर त्याला "कतआ" म्हणतात.

क)  रुबाई हा एक काव्य प्रकार आहे जो फक्त चार ओळींचा असतो. रुबाई हा काव्य प्रकार फार्सीत ऊमर खय्याम याने लोकप्रिय केला. रुबाईचे अनेकवचन रुबाइयात असे आहे. रुबाईचे अपले ५४ वृत्त आहेत. यातच रुबाई लिहावी लागते. खाली  डॉ. शेख इकबाल मिन्ने यांची एक रुबाई उदाहरणा दाखल देत आहे.

दु:खद माझे जीवन सारे जगलो
हरलो सारे मात्र नव्याने लढलो
डोक्यावर आकाश कितीदा पडले
मात्र लपोनी भीत कधी ना बसलो >>>>>( वृत्त-मिहिर )

रुबाईच्या संदर्भात अजून बरेच नियम आहेत पण त्या क्लिष्ट क्षेत्रात जाण्याचे सध्या प्रयोजन नाही.
 नियमात अडकून बसण्यापेक्षा चारोळ्या भरपूर वाचव्यात आणि तंत्र आत्मसात करावे. मी श्री. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांचे वाचन आणि मनन करण्याचे  सर्वांना सुचवेन.चारोळ्या गजलांप्रमाणे वाचकांच्या हृदयास भिडायला हव्यात. काय सांगायचे आहे ही प्रस्तावना पहिल्या तीन ओळीत आणि प्रभावी शेवट (क्लायमॅक्स) शेवटच्या ओळीत असा यावा की वाचकाने लागलीच दाद दिली पाहिजे.
सर्व चारोळी रचनाकारांना माझ्य हार्दिक शुभेच्छा.


  

Saturday, March 23, 2013

यादों का खजाना है


अपनों से गिला शिकवा
कभी हमने न जाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

वाक़िफ हूं खूब तुझ से
तनहाई मत डराना
सदियों से साथ तेरा
तू ही मेरा तराना
अंदर उदास फिर भी
खुद को ही रिझाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

गर्दिश मे है सितारे
किसकी दुवा नही है
आँखें है सुर्ख मेरी
मय को छुआ नही है
गायब है नींद फिर भी
सपनों को सजाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

शबनम की ओस से भी
पहचान कहाँ मेरी?
असवन की चली आँधी
आहट जो सुनी तेरी
दिल की लगी को फिर भी
अश्कोंसे बुझाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

साकी के संग पीना
क्या दिन वो सुहाने थे !
पीने के दौर सारे
मिलने के बहाने थे
साकी नही है फिर भी
आँखों से पी जाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

मुष्किल है समझ पाना
मुझको हिसाब तेरा
क्या हाल बन गया है
परवरदिगार मेरा?
बेबाक मै हूं फिर भी
कफ़न  तो सिलाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Friday, March 22, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग १


परवाच माझ्या दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्र्क्रिया झाली. एक १५ मार्च आणि दुसरी १९ मार्चला झाली. गेले ८/१० दिवस डोळ्यावर काळा चष्मा लाऊन, खिडक्याचे पडदे बंद करून अंधारात वेळ घालवतोय हल्ली. अंधाराशी हितगूज करत काळोखाशी बघता बघता दोस्ती पण झाली ! वेळ घालवण्यासाठी सर्व प्रकारचे संगीत- गाणी, गजला, रागदारी, भावगिते वगैरे वगैरे ऐकले. आणि हे करताना मला बरेच कांही गवसले. अंधारात मला खरेच नवा प्रकाश मिळाला.
आपण गाणी ऐकताना नॉर्मली धुन; चाल आणि संगीत ऐकतो आणी गाण्याच्या शब्दांकडे फार कमी लक्ष असते. मी सर्व गाणी शब्दांकडे (काव्याकडे) लक्ष देवून ऐकली आणि मला वेगळाच अनुभव मिळाला. म्हणुनच मी म्हणालो की अंधारात मला प्रकाश गवसला. वेगवेगळ्या कवींनी, शायरांनी किती सुरेख शब्द सुनियोजित पध्दतीने वापरले आहेत हे बघून थक्कच झालो. एके दिवशी पूर्ण दिवस गाणी ऐकल्यानंतर या वेदनेच्या काळातही मला खालील ओळी सुचल्या या संबंधातात


काल काव्याचा मनाला स्पर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

काळजाला काल मी देऊन बसलो
कोंदणे हृदयात मी रुजवून बसलो

शब्द पाचूंचीच ती बरसात होती
मी भुकेला भेटली खैरात होती

अशा मनाच्या चिंब अवस्थेत विचार केला की माझा हा अनुभव इतरांशी शेअर करावा. मी प्रथम हिंदी सिनेलातील गीत आणि संगीताबद्दल बोलणार आहे. जुन्या काळची गाणी आणि संगीत अतिशय उच्च दर्जांची होती. हा एक मोठा खजाना आहे याची आपणास जाण असावयास हवी. अतिशय अर्थपूर्ण रचना, प्रसंगास पोषक असे संगीत, सुमधूर चाली आणि आजही ती गाणी ऐकून त्यात तल्लीन होणे या खुब्या आहेत.
मी आज जे गीत निवडले आहे ते १९५९ साली निर्मित सुजाता या चित्रपटामधील आहे. गायक-तलत महमूद, गीतकार. मजरूह सुल्तानपुरी, आणि संगीतकार-सचिनदेव बर्मन, दि ग्रेट.
तलत महमूदचा आवाज हा अतिशय हळूवार, मखमली पोताचा होता. दर्दभरे गीत गावे ते तलत महमूदनेच ही त्यांची त्या काळी ख्याती होती. त्यांचे गाणे ऐकताना हृदयावरून मोरपीस फिरवल्यागत वाटायचे. सचिनदेव बर्मन यांच्या संगीताबद्दल काय बोलावे. सगळेच अल्टिमेट असायचे. या गीतातील बासरीचे पीसेस ऐका. किती हळूवार आहेत याचा अनुभव घ्या. हे गीत खालील प्रमाणे आहेत.

जलते है जिनके लिए तेरी आँखों के दिये
ढूंड लाया हूं वही गीत मै तेरे लिए

दर्द बन के जो मेरे दिल मे रहा ढल ना सका
जादू बन के तेरी आँखों मे रुका, चल ना सका
आज लाया हूं वही गीत मै तेरे लिए

दिल मे रख लेना इसे हाथोंसे ये छूटे न कहीं
गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं
गुनगुनाउंगा येही गीत मै तेरे लिये

जब तक ना ये तेरे रस के भरे होटों से मिले
यूं ही आवारा फिरेगा यह तेरी जुल्फों के तले
गाये जाउंगा येही गीत मै तेरे लिए
प्रत्येक कडवे किती प्रेमळ भावात ओथंबलेले आहे ! जो गीतकार "गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं"
असे स्वतःच्या गीताबद्दल लिहितो त्याने गीत लिहिताना किती काळजी घेतली असेल. पूर्ण गाणे वाचून त्याची ही ओळ किती सार्थ वाटते !
आता थोडे पिक्चरायजेशन बद्दल. हा व्हिडियो पाहताना सर्वांना एकदम वेलकम चेंज वाटेल. डोळ्यांना, कानाला आणि डोक्याला सूदींग वाटेल. सध्याच्या गाण्याचे पिक्चरायजेशन म्हण्जे ५०/६० मुलामुलींचा घोळका मागे कुत्रे लागल्याप्रमाणे पळत असतो. वाचक रसिकांना थोड्या चांगल्या विश्वात नेण्यासाठी खाली या गाण्याची व्हिडियो लिंक देत आहे. क्लिक करून डोळे झाकून शांतपणे ऐका आपणास स्वर्गसुखाचा अनुभव येवून समाधी लागेल
http://www.youtube.com/watch?v=YwxHIkL_b7k

मी एक प्रयोग म्हणून हे लिखाण केले आहे. आपणास कसे वाटले या बद्दल जरूर मतप्रदर्शन करा म्हणजे मला पुढील दिशा मिळेल




Wednesday, March 20, 2013

काय वेगळे जगून केले?


भार जाहलो धरेस मी हे
किती उशीरा कळून आले?
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

जसा जन्मलो वाढत गेल्या
सातत्त्याने माझ्या गरजा
शोध सुखाचा घेत राहिलो
करीत आलो रोज बेरजा
माझ्यातच मी गुरफटलेला
असेच जीवन सरून गेले
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

छाया देण्या ऊन झेलती
इतरांसाठी झाडे जगती
मंदमंदसा उजेड देण्या
तेवत असते सदैव पणती
परमार्थाचे विचार येण्या-
अधी मनातुन पळून गेले
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

आदर्शाची किती वानवा !
सारे दिसती भरकटलेले
मार्ग दावण्या कुणीच नाही
काळे गोरे बरबटलेले
इमानदारी अन् शुचितेचे
बुरखे सुध्दा गळून गेले
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

सरणावर भाजावी पोळी
टाळूवरचे खावे लोणी
हेच सूत्र जगण्याचे झाले
अपुले नसते खरेच कोणी
जग हे स्वार्थी इथे कुणी का
कोणासाठी झुरून मेले?
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

धरतीवरची माती व्हावे
जगास चारा देण्यासाठी
लाख असू दे सर्प भोवती
व्हावे चंदन झिजण्यासाठी
नकोच देवा जन्म मानवी
पशू अर्जवे करून गेली
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, March 14, 2013

माझी पहिली विदेश वारी

माझा मुलगा आणि सून आमेरिकेत बोस्टन येथे रहात होते. मुलगा सारखे बोस्टनला येण्याविषयी आग्रह करत होता. मी त्या वेळी नोकरीवर असल्याने रजा नाही या सबबीखाली टाळत होतो.एका शनिवारी फोन खणाणला.
फोनवर मुलगा बोलत होता. नेहमीचे बोलून झाल्यावर त्याने बाँबशेलच टाकला. म्हणाला तुमचे आणि आईचे मुंबई ते न्यूयॉर्क विमानाचे तिकिट कुरियरने पाठवले आहे. अमूक अमू़क तारखेचे आहे आणि बांधाबांध सुरू करा. प्रवास नक्की ठरला याचे मुख्य कारण म्हणजे प्रवासाच्या खर्चिक बाबीची काळजी मुलाने घेतली होती. नाही तरी मध्यवर्गातील महाराष्ट्रीयन माणसाने दरडोई ४५,००० रुपायाचे तिकिट काढून प्रवास करणे म्हणजे कपिलाशष्टीचा योगच! दुसरे महत्वाचे गोड कारण म्हणजे आम्ही दोघेही आजी आजोबा होणार होतो. तेंव्हा नाही म्हणून टाळायचा आता  प्रश्नच नव्हता.
प्रवासाचा ( मुंबई--बोस्टन व्हाया लंडन ) दिवस निश्चित झाला आणि घरातले वातावरणच बदलून गेले. सोबत काय काय घ्यायचे? मुलांना काय काय आवडते? सुनेचे बाळंतपण म्हणजे डिंकाच्या लाडूचे सामान, बाळंत झाल्यावर सुनेला रोज आळिवाची खीर आशा नाना विषयावर चर्चेच्या फैरी झडू लागल्या. वर "श्री गणेशायनमः" असे लिहून खरेदीच्या याद्या बनू लागल्या.
फोनवर संभाषण झाल्यानंतर चारच दिवसानी फेडेक्स या आमेरिकन पोस्टल कंपनीचा एक जाडजूड लिफाफा आला ज्यात दोन तिकिटे, व्हिसा मीळवण्यासाठी अवश्यक ती कागदपत्रे आणि प्रवासाच्या अथ पासून इती पर्यंत दिलेल्या सविस्तर सुचना होत्या. मला वाटते आमचा प्रवास हा साध्याच पण कधी न अनुभवलेल्या गोष्टी बघण्यामुळेच अविस्मरणीय झाला. आता हेच बघा ना ! आपणाला पाठवलेले पत्र देशातल्या देशात ८ ते १५ दिवसांनी पोहंचणे यात कांही गैर वाटत नाही. पण बोस्टनहून पाठवलेला लिफाफा चार दिवसात हाती पडला. येथूनच मनात अमेरिकेचे कौतुक वाटायला सुरू झाले.
तिकिटावरील सर्व सुचना (अगदी बारीक अक्षरातल्या) दहा वेळेस तरी मी वाचल्या असतील. ओघाने ओघाने ध्यानात आले की दरडोई दोन बॅगा आणि प्रत्येक बॅगेतील सामानाचे कमाल वजन ३२ किलो पेक्षा जास्त नसावे असे ध्यानात आले. आणि त्या अनुषंगाने खरेदीला सुरुवात झाली. १५ दिवस चर्चा आणि खरेदी हेच अव्याहपणे
 चालू होते.
आणि प्रवासाचा दिवस येऊन ठेपला.आम्ही मुंबईला सहारा इंटर नॅशनल विमानतळावर पोहंचलो. मनात एक सुप्त भिती होती.कारण आमची ही पहिलीच "खेप" (वारी) होती देशाटन करण्याची.
प्रवास एअर इंडीयानेच होता. प्रथम चेक इन काउंटरवर गेलो. वजनदार सामान तेथे हवाली केले.बॅग्ज भरताना आम्ही तरकाट्याने (स्प्रिंग बॅलन्स) प्रत्येक बॅगचे वजन करून कमाल मर्यादेत आहे याची खात्री करून घेतली . काऊंटरवर एका बॅगचे वजन ३२ ऐवजी ३० किलो भरले. मी आणि माझी पत्नी दोघांच्याही  मनात आले की अरे रे! अजून थोडे सामान घेता आले असते. इमायग्रेशन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून डिपार्चर लाउंज मधे थांबून थोड्या वेळातच आम्ही विमानात बसलो.
बहुतांश विमान प्रवासी  भारतीय होते.त्यांचे एकंदरीत वागणे, वेशभूषा, जीवनाचा प्रत्येक क्षण एंजॉय करण्याची वृत्ती बघून वाटत नव्हते की भारत एक गरीब देश आहे. ते विश्वच वेगळे होते. विमानाने झेप घेतली आणि आम्ही दोघांनीही डोळे मिटले. परक्या जगात सुखरूप प्रवास व्हावा म्हणून मनात अथर्वशिर्षाचे पठण करत  देवाचा धावा केला.
पहिला प्रवास हिथ्रो विमानतळ, लंडन हा साडेआठ तासाचा होता.तेथे उतरून आम्हाला वेगळ्या धावपट्टीवर जाऊन दुसरे विमान लंडन- न्यूयॉर्क पकडायचे होते. कोणत्या धावपट्टीवर विमानात बसायचे ते मुलाने कळवले होते. हे विमानतळ प्रचंड मोठे आहे.पहिल्या टर्मिनलवरून शेवटच्या टर्मिनलवर जाण्यासाठी रेल्वेने जावे लागते.आमची धावपट्टी त्या मानाने जवळ होती. आम्ही चालत गेलो. प्रत्येक ठिकाणी इंडीकेशन बोर्ड्स इतके स्पष्ट होते की आम्ही वीस मिनिटे चालल्यानंतर हव्या त्या धावपट्टीवर पोहंचून चेक-इन केले.पुढील विमानास अडीच तासाचा वेळ होता.थंडी कडाक्याची असूनही मी विमानतळाबाहेर फेरफटका मारला. त्यात प्रकर्षाने ध्यानात आलेल्या गोष्टी खालील प्रमाणे होत्या.
---अतिशय रूंद रस्त्यावर मी पाथवे वरून चालत होतो.कोठेही पथारीवाला दिसला नाही.
---सार्वजनीक रस्ता असूनही कोठेही घाण नव्हती.
---एकाही कोपर्‍यात कणीही थुकलेले दिसले नाही
---परिसरात कोठेही कुण्या दादाच्या किंवा भाऊच्या वाढदिवसाचे किळसवाणे फ्लेक्स दिसले नाहीत.
---"शादीके पहले या शादीके बाद"असे गुप्तरोग आणि लैंगिक समस्येवर इलाज करणार्‍या दवाखान्याच्या जाहिराती दिसल्या नाहीत.
I WAS MISSING MY INDIA COMPLETELY.
पुन्हा पुढील प्रवास सुरू झाला. न्यूयॉर्क विमानतळावर मुलगा आला होता.त्याच्या सोबत कारने बोस्टनला पोहंचलो आणि प्रवासाची नवलाई संपली.
यथावकाश एका नातीचे आम्ही आजी आजोबा झालो.नव्या बाळात सर्वच रंगून गेले.कशी गंमत असते नाही! बाळ जन्मले की पूर्ण कुटुंब त्याच्या भोवती फिरत असते. ते सर्वांच्या जगण्याचे केंद्रबिंदू बनते. आमचेही तेच झाले.ते दिवस आम्हासाठी स्वर्गसुखाचे ठरले.कसे उडून गेले कळलेच नाही. व्हीसाची मुदत संपत आली आणि परतीच्या प्रवासाचे वेध लागले. येताना खूप उत्साह, कुतुहल, उर्जा होती. परतताना नेमकं उलट घडत होतं.
मरगळ, मरगळ आणि फक्त मरगळ ! चिमुरड्या नातीत जीव एवढा अडकला होता की डोळे पुन्हा पुन्हा ओलावत होते.शेवटी विमानतळावर हुंदका आवरत मुलगा, सूनबाई आणि नातीला टाटा केला. निघायच्या आदल्या रात्री मनाची सारखी घालमेल होत होती.रात्रभर झोप नव्हती.  त्या रात्री नातीच्या विरहाचे दु:ख सांगणारी एक रचना झरणीतून ओघळली ती अशी :--

एकही नसता नभ आकाशी वीज कशी ही कडकडली?
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

निद्राधिन तो गोंडस चेहरा जणू चंद्रमा वसे घरी
संगमरमरी रूप लाडके आनंदाच्या पडती सरी
शांत स्पंदने असता छाती आज अशी का धडधडली?
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

तुझ्यामुळे ना कळले आम्हा दिवस कसे गेले उडुनी
सुख संसारी पीत राहिलो अमृत आम्ही सदैव बुडुनी
चाहुल येता तव विरहाची स्वप्ने सारी गडगडली
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

फुलांपासुनी सौरभ आणि चंद्रा पासुन शीतलता
वसंत ऋतुच्या पासुन होतिल दूर कधी का तरूलता?
सुंदर गाणे सोडुन जिंव्हा विरह गीत का बडबडली?
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

कस्तुरी मृग असताना सदनी धूंद राहिलो सुगंध पिउनी
दूर रहावे कसे तिजविना जीवन गेले सुन्न होउनी
सवय असूनी एकांताची मनोभावना चिडचिडली
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

परतीच्या प्रवासाची सांगता विरह भावनेमुळे एका वेगळ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली.




Monday, March 11, 2013

मुझसे साया बिछड गया


सूरज ढलने से कुछ पहले
लंबा था मेरा साया
रात हुई और हुआ अंधेरा
साया मुझसे  बिछड गया

कल तक नामुमकिन लगता था
मौसम आया तनहाई का
पागल ढूंडे विरानी मे
एक सूर शहनाई का

कोयल भी गाती है क्यूं
गीत विरह के चारों ओर ?
खण्डहर बना जीवन मेरा
कहाँ गया अपनोंका शोर ?

खुशियों के लम्होंको शायद
याद नही मेरी बस्ती
सागर तट पर बैठा है कब से
प्यासा एक अगस्ती

गुमशुदा अपने किनारे
खोज़ रही है नदिया
बेमतलब बहना है उनको
कितनी दिन कितनी सदियां ?

फसा है पंछी रश्तों मे जो
रब की ओर उडाना है
चलो उठो कर लो तैय्यारी
शव को स्वयं उठाना है


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com







Friday, March 8, 2013

एकटा चालू किती मी?


एकटा चालू किती मी?
ना धराया बोट आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे

शोध घेतो, चाचपडतो
नीट ना कळतो कधी
चेहरा मज जीवनाचा
स्पष्ट ना दिसतो कधी
सूर्यकिरणे हरवलेली
अन् धुके घनदाट आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे

हुंदक्यांशी नाळ आहे
जोडलेली पण तरी रे
दोष ना तुजला दिला मी
जाण हे तू श्रीहरी रे
याचना? छे! आपलीही
खूप कॉलर ताठ आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे

राबता असता सुखाचा
जीवनाचा थाट आहे
दु:ख येता थोडकेही
वाटते ती लाट आहे
कुंभ भरला जीवनाचा
आज काठोकाठ आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे

तोंड ओळखही सुखाची
जाहली नाही जयाला
तो सुखी, दु:खात असतो
दु:ख ना वाटे तयाला
जेवणाला वाढलेले
वेदनांचे ताट आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे

दु:ख माझे ते तुझेही
ईश्वरा! आहे खरे ना?
वासही करतोस माझ्या
अंतरी तू हे खरे ना?
संगमी तुझिया नि माझ्या
मुक्त होण्या घाट आहे
ध्येय आहे दूर अन् ही
कंटकांची वाट आहे


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mila-- nishides1944@yahoo.com

Thursday, March 7, 2013

अश्कोंको बहलाता है


बारिश मौसमका हर लम्हा
खुष्कोंको बहलाता है
सफर पुराने कुछ यादोंका
अश्कोंको बहलाता है

कितने वादे कितने सपने?
हर वादा था सपनासा
अच्छा हुआ जगा दिया अब
दिखे न कोई अपनासा
जंगल यह झूठे वादोंका
अश्कोंको बहलाता है

नर्म रेत पर निशाँ पाँव के
हमने कितने छोडे थे
लिखकर अपने नाम रेत पर
आरमानों से जोडे थे
आया तूफाँ जब दर्दोंका
अश्कोंको बहलाता है

सुख मे तो हमराज मिले
सोंचा दुख मे साथ करें
दर्द भरी भावूक आँखोंसे
शबनम की बरसात करें
सहारा नही जब कंधों का
अश्कोंको बहलाता है

चंदा सूरज मे धरती का
पर्दा, ग्रहण लगाता है
कैसा पर्दा था आपस मे?
अब भी ज़ख्म जगाता है
ज़िक्र जहाँ भी हो पर्दोंका
अश्कोंको बहलाता है

हीर रांझ क्या लैला मजनू?
कैसी यारी कैसे यार?
कराहों भरा जीवन फिर भी
बेमिसाल था उनका प्यार
टूटा दिल जब भी बंदोंका
अश्कोंको बहलाता है

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com