Thursday, May 9, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग-४


माझा आवडता गायक तलत मममूद याच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने---

लखनौ मधे एका सनातनी (ऑर्थोडॉक्स) मुसलमान कुटुंबात २४ फेब्रुवारी, १९२४ रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्या वेळी कुणाला स्वप्नातही वाटले नसावे की देशातील एका भावी गायकाचा जन्म झाला आहे. खरेच भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे आज पर्यंत कोणालाही कळलेले नाही. हे जन्मलेले व पहिले श्वास घेत असलेले बाळ म्हणजेच नंतरच्या काळचा प्रसिध्द गायक तलत महमूद होय.
तलतने अगदी लहान वयातच आपली संगीतातील रुची दाखऊन दिली. गाणे ऐकण्याचा, विशेशतः रागदारी संगीत -खूप नाद होता. रात्रभर जागून तो संगीताच्या मैफिली ऐकत असे. संगीत त्याला जीव की प्राण वाटत होते. आणी हा शौक वाढतच गेला. त्याचे कुटुंब सनातनी असल्यामुळे घरात संगीताला विरोध होता. संगीत हे मुस्लीम समाजात अन-इस्लामिक मानले जाते. हा केवढा विरोधाभास आहे पहा! रागदारी संगीताच्या क्षेत्रात दिग्गज गायक आणि उस्ताद मुस्लीम आहेत. पण असे मानले जाते की संगीत इस्लाम विरोधी आहे. असो.
घरातील विरोधाला तोंड देत देत तलतने संगीत शिकण्यास सुरुवात केली. Maris College of Music म्हणजे आताचे भातखंडे संगीत महाविद्यालय, येथील पं. भट यांच्याकडे १९३० मधे संगीताचे धडे घेण्यास सुरू केले. या नंतर तलतला अ‍ॅक्टिंग मधे पण रुची निर्माण झाली आणि त्या दिशेने त्याने पावले उचलण्यास सुरुवात केली. संगीत आणि अ‍ॅक्टिंग हे दोन छंद जोपासणे घरच्यांना मंजूर नव्हते. शेवटी तलतला घर आणि अ‍ॅक्टिंग या पैकी एकाची निवड करणे भाग पडले आणि त्याने आपला छंद जोपासयाचा निर्णय घेतला आणि घराला रामराम ठोकला. लखनौ सोडून कलकत्ता जवळ केले.
वयाच्या सोळाव्या वर्षी तलतने गझल गायक म्हणून १९३९ साली आपले संगीतातले करिअर सुरू केले..प्रसिध्द शायर दाग, मीर, जीगर इत्त्यादीच्या गझला रेडियो लखनौ वर गात असे. त्याच्या आवाजाचा पोत कांही काळातच रसिकांच्या आणि संगीतकारांच्या नजरेत भरला. यामुळेच की काय १९४१ मधे HMV या प्रसिध्द रेकॉर्ड कंपनीने त्यांना पहिल्या गाण्याचे निमंत्रण देऊन करारबध्द केले. तलतला. दहा वर्षाच्या खडतर तपस्येनंतर आणि नाव कमवल्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला पुन्हा घरात स्विकारले.
तलतला खरा ब्रेक मिळाला तो त्याच्या पहिल्या गैरफिल्मी गझल "तसवीर तेरा दिल मेरा बहला न सकेगी" मुळे. या गझलेस अमाप प्रसिध्दी मिळाली. आता तलत फक्त लखनौ आणि कलकत्त्याचा न राहता पूर्ण देशाचा झाला. शेवटी तलतने करिअरसाठी १९४९ मधे आपले बोर्‍याबिस्तर मुंबईला हलवले.
जुन्या काळी एकच व्यक्ती अ‍ॅक्टिंग आणि गात असेल तर त्याला खूप स्कोप होता. या मुळेच के. एल. सहगल, किशोर कुमार, अशोक कुमार (हादरलात! होय, अशोक कुमारनेही गाणी गायली आहेत), सुरैया, नूरजहाँ हे त्या काळी प्रसिध्द होते. असेच तलतचेही घडले. त्याने पण अ‍ॅक्टिंग केली तीही एक नाही दोन नाही तब्बल १६ फिल्म्स मधे! त्याच्या बरोबर काम केलेल्या नट्या म्हणजे कानन बाला. भारतीदेवी, शामा, नादिरा, सुरैया, शशिकला, माला सिन्हा, नूतन वगैरे वैगरे.
तलतचा गायनाच कालखंड १९३९ ते १९८६. त्याने श्रोत्यांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. त्या काळात केत्येक देशात त्याचे कार्यक्रम खच्चून भरलेल्या सभागृहात झाले. त्याला इंग्लंडच्या रॉयल अल्बर्ट हॉल मधे लाइव्ह कार्यक्रम करायचा मान मिळाला. विदेशात त्याच्या कार्यक्रमाला लोक अधीच रांग लावून ताटकळत बसत असत. तलत म्हणजे दर्द, तलत म्हणजे मखमली आवाज, तलत म्हणजे रसिकांच्या दिलाचा राजा अशी त्याची ख्याती होती. अत्त्यंत हळुवार, मनमिळाऊ होता तो. दिलीप कुमार त्याला perfect gentleman म्हणत असे. जसा रेशमी आवाज तसाच रेशमी कोणताही पीळ नसणारा स्वभाव. त्याचे एकही गाणे असे नाही की ऐकणार्‍याच्या ह्रदयाला भिडत नाही. अशा गुणी कलाकाराचा भारत सरकारने १९९२ मधे पद्म भूषण हा किताब देवून सत्कार केला.
पण १९६० च्य सुमारास हलकी फुलकी आणि रॉक अँड रोल टाईप गाणी यायला सुरुवात झाली आणि तलत मागे पडला. मागणी तसा पुरवठा या न्यायाने संगीतकारही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले. हा काळ फार कठीण असतो कलाकारांसाठी. हे घडणे अपरिहार्य असले तरीही तगमग होतेच ना! पिढी बदलली . सचिनदेव बर्मन यांनी त्यांच्या गाण्यांचे सोने करून घेतले तलतच्या गळ्या द्वारे. पण राहुलदेव बर्मनने तलतला घेणे शक्यच नव्हते. त्याच्या संगीताचा पोतच वेगळा होता.
तलतने अगदी कमी म्हणजे एकूण ८०० च्या जवळपास गाणी गायली. आशा या गुणी गायकाने आजच्याच दिवशी म्हणजे ०९.०५. १९९८ ला शेवटचा श्वास घेतला आणि पैगंबरवासी झाला. अ‍ॅक सुरेख वाटचाल संपली. एक हळुवार मोरपीस अल्लाह कडे गेलं. काळ हा सर्वात क्रूर असतो. त्याला कुणाचाही मुलाहिजा नसतो. कधी कधी मनात अशक्य असे प्रश्न येतात. तलत सारखे अनेक कलाकार र जेंव्हा आपापल्या कारकिर्दीच्या परमोच्च बिंदूवर असतात तेंव्हाच काळाच्या घड्याळाचे काटे का बरे थांबत नाहीत? का ही माणसे मनाला असा चटका लाऊन जातात! एक गोष्ट बरी आहे की असे गुणी लोक अपल्या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्य भोवती मृत्त्यूनंतरही दरवळत असतात.
आज माझ्या या मालिकेअंतर्गत मी ज्या गाण्याची निवड केली आहे ते देख कबिरा रोया या १९५७ सालच्या चित्रपटातील आहे.संगीतकार मदनमोहन दी ग्रेट आणि गीतकार राजेंद्र कृष्ण हे आहेत. गायक अर्थातच तलत महमूद मी या गाण्या बद्दल कांही लिहीत नाही कारण लेखण खूप प्रदीर्घ झालं आहे. तुम्हीच ते ऐकून ठरवा कसे आहे ते!. या गाण्याचे बोल खाली देत आहे.
हम से आया ना गया, तुम से बुलाया ना गया
फासला प्यार में दोनों से मिटाया ना गया

वो घड़ी याद हैं, जब तुम से मुलाकात हुई
एक इशारा हुआ, दो हाथ बढ़े, बात हुई
देखते, देखते दिन ढल गया और रात हुई
वो समां आज तलक़ दिल से भूलाया ना गया

क्या खबर थी, के मिले हैं तो बिछड़ने के लिए
किस्मते अपनी बनाई हैं, बिगड़ने के लिए
प्यार का बाग़ लगाया था, उजड़ने के लिए
इस तरह उजड़ा के फिर हम से बसाया ना गया

याद रह जाती हैं और वक्त गुजर जाता हैं
फूल खिलता ही हैं, और खिल के बिखर जाता हैं
सब चले जाते हैं, कब दर्द-ए-जिगर जाता हैं
दाग जो तूने दिया, दिल से मिटाया ना गया
हे गाणे ऐकाण्यासाठी क्लिक कराhttp://www.youtube.com/watch?v=0FdShtk9FYA

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1044@yahoo.com

No comments:

Post a Comment